काहीजण याला वरणफळ म्हणतात, चिकोल्या, चकोल्या असेही म्हणतात. एकदम पोटभरीचे आहे. आम्ही संध्याकाळी हा एक पदार्थ केला की काही दुसरे करत नाही. पटापट साहित्य आणि क्रुती लिहुन घ्या.
साहित्य :-
शिजवलेली तूर डाळ २-३ वाटी
कणिक ३ चपात्यासाठीची
मीठ चवीनुसार
तिखट चवीनुसार
ओवा २ चिमट
मेथीदाणे १/४ चमचा
मोहरी
हळद
कढीपत्ता
लसुण ८-१० पाकळ्या
कोथिंबीर
गोडा मसाला
गुळ
तेल
क्रुती:-
१) कणिकेत थोडे तेल घालुन मीठ, तिखट, ओवा, चिमुटभर हळद घालुन जरा घट्टसर मळुन घ्यावे.
२) कढईत फोडणीसाठी तेल तापवायला ठेऊन त्यात मेथी दाणे, मोहरी, हळद, कढीपत्ता, लसुण घालावा. त्यात शिजवलेली डाळ घालावी.
३) ऊकळी फुटल्यावर त्यात चवीनुसार तिखट, मीठ, एक छोटा खडा गुळ, एक चमचा गोडा मसाला, २ आमसुले घालुन शिजवत ठेवावे.
४) मळलेल्या तिखटमीठाच्या कणकेचा गोळा घेऊन तो मोठा पोळपाटभर लाटावा. शंकरपाळ्यांच्या चक्रीने छोटेछोटे चौकोनी तुकडे करावेत. हे तुकडे उकळत्या वरणात घालावे व शिजऊन घ्यावेत.
५) खाताना गरम गरम चकोल्यांवर कोथिंबीर व तुप घालुन खावे.
No comments:
Post a Comment